Categories
Marathi Good Morning SMS
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्य
ध्येयाचे वादळ, अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत
येणारा क्षण आपलाच आहे शुभ सकाळ.
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण
कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक
नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना
नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते शुभ सकाळ!
न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
कधी कधी “नशीब” सुद्धा हरते पाणी धावतं म्हणून
त्याला मार्ग सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो
त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच
शुभ सकाळ! आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो.
कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलात जावे'
क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे'
अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे'
नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे
शुभ सकाळ आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो.
नशीब आकाशातून पडत नाही, किव्हा जमिनीतून उगवत नाही'
नशीब आपोआप निर्माण होत नाही तर, केवळ माणूसच
प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो' नशिबात
असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका' कारण आपण
जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा
शुभ सकाळ! आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो.
माझ्यामुळे तुम्ही नाही तर, तुमच्यामुळे मी आहे
हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी
जोडली जातात' आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं' पाहिलं तर दिसत
नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही शुभ सकाळ!
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची
पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती
आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची, सकाळच्या सुंदर शुभेच्छा
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही' पण मला
मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ
म्हटल्याशिवाय राहवत नाही शुभ सकाळ!
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते
शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा' जेव्हा आर्थिक
परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा' जेव्हा एखादं पद
किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा' जेव्हा अत्यंत
रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा' यालाच आयुष्याचे
सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते
अंतःकरणाची संपत्ती आहे' ज्याला ही संपत्ती
सापडते तो खरा सुखी होतो' दुस-याचं हिसकावून
खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून
खाणारा कधी, उपाशी मरत नाही शुभ सकाळ!